एम.एस.हुलसूरकर/हुलसूर : सुमारे २२ वर्षांपासून महाराष्ट्र श्री.सदगुरु विरुपाक्षेश्वर मठापासुन औराद शाहजनी ते दक्षिण काशी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या केतकी संगमेश्वर झहीराबाद (आंध्रा) पर्यंत औराद पासून गुरुवारी सकाळी सहा दिवसांच्या पदयात्रेला सुरुवात झाली.
यावेळी हुलसूर परिसरात आगमन होताच फ्रेंड्स धाब्याचे मालक शिवकुमार म्हेत्रे यांनी सत्कार करून चहा नाष्टाची व्यवस्था केली होती. या पदयात्रेला २२ वर्ष पूर्ण होत आहे, यावर्षी देशावर असलेल्या कोरोना संकटामुळे ४० ते ५० भाविकांच्या उपस्थितीत ही पदयात्रा काढण्यात आली. पदयात्रेचा उद्देश वर्षातून एकदा पायी चालत जावून आपल्या कुलदैवत प्राप्ती समर्पित करणे व जाती भेद प्रेम व्रध्दींगत करणे परस्परात सलोखा व सहकार्य भावना निर्माण ठेवणे, एकमेकांच्या सुख-दुखात सहभागी होणे, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे असे टाळ मृदंगाच्या गजरात नामजप घेत पदयात्रा सुरू झाली. पहाटे संगीत शिवपाठ, प्रवचन, किर्तन, भजन असे नित्य कार्यक्रम आहेत.
यावेळी व्हि.एस.कस्तुरे सर, करबस स्वामी, बस्वराज सजनशेट्टी, त्रिंबक राघो, धुळाप्पा भतमुर्गे, रामलींग गस्तगार, रघुनाथ मंगशेट्टी, शिवप्रसाद मंगशेट्टी, देवप्पा हुमनाबादे,सुतार गुरुजी महिला कस्तुरा महानंदा, साधना भतमुर्गे, राघो गौरम्मा आदी पदयात्रेत सहभागी होते.