मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या मार्च महिन्यांपासून बंद असलेली महाविद्यालय लवकरच सुरु होणार आहेत. येत्या १५ फेब्रुवारीपासून महाविद्यालय सुरू करणार असल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. सध्या ५० टक्के विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये महाविद्यालय सुरू केले जातील. तसेच विद्यार्थ्यांना परीक्षा ऑनलाईन आणि ऑफलाईन असे दोन्ही पर्याय असतील. शाळेत किंवा महाविद्यालयात ७५ टक्के उपस्थिती अनिर्वाय असणे गरजेचे असते. मात्र यंदा कोरोनामुळे ही अट शिथील करण्यात आली आहे.
युजीसीच्या गाईडलाईन्सनुसार राज्य सरकारने महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी दिली आहे. जे विद्यार्थी महाविद्यालयात येऊ शकत नाही त्यांना ऑनलाईन क्लासेसचा पर्याय उपलब्ध राहील, अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.