मुंबई : प्रजासत्ताक दिनी दिल्लीत सुरु असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. यावरुन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारला दोषी ठरवलं आहे. खा. राऊत यांनी ट्विट करत केंद्र सरकारवर हल्ला चढवला आहे.
राऊत म्हणाले सरकार या दिवसाची वाट पाहत होती का? सरकारने शेवटपर्यंत लाखो शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकले नाही, ही कुठल्या प्रकारची लोकशाही आमच्या देशात वाढत आहे. ही लोकशाही म्हणता येत नाही. हे काही वेगळंच चालले आहे. जर सरकारला वाटले असते तर हिंसा थांबवता आली असती. दिल्लीमध्ये जे सुरू आहे त्याचे समर्थन करता येणार नाही. कुणीही असो लाल किल्ला आणि तिरंग्याचा अपमान सहन करणार नाही. मात्र वातावरण का बिघडले? सरकार शेतकरी विरोधी कायदे का रद्द करत नाही. कुठले अदृश्य हात राजकारण करत आहेत असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे.