मुंबईः राज्यात कोरोनाचा प्रकोप झाला आहे. रूग्ण संख्येत वाढ होत आहे. या पार्श्वभुमीवर नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करणार आहे. नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा होणार नाही, असा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.
राज्यातील पहिली ते आठवी पर्यत इयत्तेच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास केले जाणार असल्यायाचे ३ एप्रिल रोजी घोषणा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली होती. तसेच या विद्यार्थ्यांची कोणत्याही प्रकारची परीक्षा घेतली जाणार नसल्याचे ही त्यांनी स्पष्ट केले होते. तसेच नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा होणार नाही. त्यांना सरसकट उत्तीर्ण केले जाणार आहे. तर दहा आणि बारावीच्या परीक्षा या ऑफलाईनच होणार, राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
दहावी आणि बारावीच्या परिक्षा ऑफलाईनच
दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षांबाबत काय होणार याबाबत अद्यापही विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रम आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच होणार असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. या परीक्षांच्या वेळापत्रकात थोडासा बदल करायचा की नाही याबाबत येत्या एक-दोन दिवसात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे.