वाळूची तस्करी रोखण्यासाठी कडक उपाययोजना करणार – देसाई

मुंबई : राज्यात वाळूची तस्कारी रोखण्यासाठी पोलिस विभागाकडून कडक उपाययोजना करण्यात येतील अशी माहिती राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आज विधानसभेत दिली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील गोळेगाव येथे वाळू माफियांतर्फे वाळू वाहतून विरोध केल्याने एका व्यक्तीस विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आ. सुनिल प्रभू,विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, राधाकृष्ण विखे-पाटील,सदस्य बबनराव लोणीकर यांनी प्रश्न उपस्थित केला.

या प्रश्नाला उत्तर देताना राज्याचे गृहमंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, बुलढाणा जिल्ह्यातील गोळेगाव मध्ये ११ जानेवारी २०२२ रोजी यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला असून यामध्ये तीन आरोपी आहेत. त्यांचा पोलिसांनी तपास केला असता ते कुठेच सापडले नाहीत. हे आरोपी फरार असल्यामुळे पोलिसांना त्यांना अटक केला करता आली नाही. याचदरम्यान आरोपींनी अंतरिम जामीन घेतला आहे. अंतरिम जामीन रद्द करण्यासाठी पोलिस विभागाकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येईलं. तसेच वाळू तस्करीच्या घटाना घडू नयेत यासाठी पोलिस विभागाकडून नेहमीच महसूल विभागाला सरकार्य कलेे जाते. पोलिस विभाग व महसूल या दोन्ही विभागांनी वाळू तस्करी रोखण्यासाठी कडक उपाययोजना कराव्यात यासाठी या दोन्ही विभागांची संयुक्त बैठख बोलविण्यात येईल असेही राज्यमंत्री देसाऊ यांनी सांगिलते.

Share