HSC Result 2022: कोकण विभाग अव्वल, यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल 2022 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या निकालात अपेक्षेप्रमाणेच यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. राज्याचा एकूण निकाल ९४.२२ टक्के इतका लागला आहे. यावर्षी ९५.३५ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर उत्तीर्ण होणाऱ्या मुलांचं प्रमाण ९३.२९ टक्के आहे. म्हणजे परीक्षा देणाऱ्या मुलांपेक्षा २.६६ टक्के अधिक मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत कोरोना नंतर ऑफलाईन पद्धतीने उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) परीक्षा मार्च-एप्रिल २०२२ अंतर्गत लेखी परीक्षा दिनांक ०४ मार्च २०२२ ते ०७ एप्रिल २०२२ या कालावधीत आयोजित करण्यात आली होती.त उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला असून यंदा १३५६६०४ विद्यार्थी हे उत्तीर्ण झाले आहे.

विभागनिहाय निकाल
कोकण – ९७.२२ टक्के
पुणे – ९३.६१ टक्के
कोल्हापूर – ९५.०७ टक्के
अमरावती – ९६.३४ टक्के
नागपूर – ९६.५३ टक्के
लातूर – ९५. २५ टक्के
मुंबई – ९०.९१ टक्के
नाशिक – ९५.०३ टक्के
औरंगाबाद – ९४.९७ टक्के

निकालात मुलींची बाजी
दरवर्षीप्रमाणे यंदाच्या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे. यावर्षी ९५.३५ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर उत्तीर्ण होणाऱ्या मुलांचं प्रमाण ९३.२९ टक्के आहे. म्हणजे परीक्षा देणाऱ्या मुलांपेक्षा २.०६ टक्के अधिक मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.

निकालाची ठळक वैशिष्ट्ये 

१. या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून विज्ञान, कला, वाणिज्य व व्यवसाय अभ्यासक्रम या शाखांतील एकूण १४,४९,६६४ नियमित विद्याथ्र्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १४,३९,७३१ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी १३,५६,६०४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व निकालाची टक्केवारी ९४.२२ आहे.

२. या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून सर्व शाखांमधून एकूण ३५५२७ पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ३५३६८ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. त्यापैकी १८७५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण निकालाची टक्केवारी ५३.०२ आहे.
३. सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल (९७.२१%) सर्वाधिक तर सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा (९०.९१%) आहे.

४. सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थीनींचा निकाल ९५.३५ असून विद्यार्थ्यांचा निकाल ९३.२९ आहे. म्हणजेच विद्यार्थीनींच्या निकालाची टक्केवारी विद्यार्थ्यापेक्षा २.०६% ने जास्त आहे.

५. या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून सर्व शाखांमधून एकूण ६३३३ दिव्यांग विद्यार्थी होते. विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ६३०१ दिव्यांग विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. त्यापैकी ६००१ दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण निकालाची टक्केवारी ९५.२४ आहे.

६. इ.१२ वी परीक्षेस नोंदणी केलेल्या पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रचलित पध्दतीने सवलतीचे गुण देणेबाबत कार्यवाही करण्यात आलेली आहे. एकूण १५३ विषयांपैकी २४ विषयांचा निकाल १०० % आहे.
Share