‘स्वाभिमानी’ मिळवून देणार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कम

कोल्हापूरः  शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने वेळोवेळी लढा उभा केला आहे. गेल्या काही दिवसांपासून नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर १ जुलै रोजी ५० हजार रुपये जमा होणार होते. मात्र, प्रोत्साहनपर अनुदान अद्यापही शेतकऱ्यांना मिळालं नसल्यानं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आक्रमक झाले आहेत. तसेच त्यांनी स्वाभिमानीकडून आज दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला तेव्हा येत्या ९ ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांना ५० हजार मिळाले नाही, तर क्रांती राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन करण्याचा इशारा शिंदे सरकारला दिला आहे.
राजू शेट्टी काय म्हणाले?

  • आज छत्र्या घेऊन आलो आहे, उद्या याचे भाले होतील
  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तुमचे शेतीत काम केलेले फोटो पाहिले आहेत
  • मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही
  • पण केवळ फोटो टाकू नका, आमचे पैसे पहिल्यांदा द्या शेतकऱ्यांचे आशीर्वाद मिळतील
  • उद्धव ठाकरे यांच्यावर आम्ही विश्वास ठेवला पण त्यांनी ज्यांच्यावर विश्वास ठेवला तेच निघून गेले
  • निवेदनाची नाटकी करून काही होणार नाही
  • गेल्यावेळी देखील बैठकीला माझ्या अगोदर हे खासदार गेले होते
  • त्यावेळी झालेल्या बैठकीतील पैशाचे काय झाले, त्या १३५ रुपयांपैकी अजूनही १५ रुपये द्यायचे आहेत

 

Share