राज्यातील जनतेने भाजपाला नाकारल- नाना पटोले 

मुंबई :  राज्यात नगरपंचायतीसाठी झालेल्या निवडणुकीत काॅंग्रेस पक्षाची कामगिरी सुधारली आहे. विदर्भात काॅग्रेस पक्ष आघाडीवर आहे. तर कोकणात पक्षाचे खाते उघडले आहे. नगरपंचायतीचा निकाल पाहता काॅग्रेस पक्षाला समाधानकारक जागा मिळाल्या आहेत. असे काॅग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
नाना पटोले म्हणाले की, नगर पंचायत निवडणुकीच्या निकालाने राज्यातील जनतेने आपला कौल महाविकास आघाडीच्या बाजून दिला असून राज्यातील जनतेने भाजपला नाकराले आहे. भाजप मागच्या वेळी ६०० पेक्षा जास्त जागा जिंकल्या होत्या त्या आता ३०० वर खाली घसरल्या आहेत. आम्ही १७ नगरपंचायतीवरून २२ वर गेलो आहोत. काँग्रेस पक्षाने ३०० हून अधिक जागा जिंकल्या असून काँग्रेस विचारांच्या स्थानिक आघाड्यांनी ही चांगले यश मिळवले आहे. भाजपचे १०५ आमदार आहेत व आमचे ४४ आहेत तरीही काँग्रेसला चांगले यश मिळाले आहे. देशाचा व राज्याचा विकास करून सर्वांना बरोबर घेऊन जाणारा पक्ष असल्याने जनतेने आमच्यावर विश्वास टाकला असून आम्ही त्यांचा विश्वास सार्थ ठरवू. भंडा-याचा निकाल अजून येत आहे, तिथेही काँग्रेसच क्रमांक एकचा पक्ष राहील आणि सत्ता स्थापन करेल अशी आशा नाना पटोले यांनी व्यक्त केली आहे.
काॅग्रेस पक्षाने स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला तो योग्य होता हे जनतेने निकालातून दाखवून दिले आहे. स्वबळावर निवडणूक लढवल्यामुळे पूर्वी आघाडीमुळे आम्ही जिथे निवडणूका लढवत नव्हतो तिथेही आता काॅग्रेस संघटना वाढणार आहे. या निवडणुकीत काॅग्रेसचे चिन्ह पुन्हा गावागावांत पोहोचले असून आगामी काळातील निवडणूकांत यांचा पक्षाला मोठा फायदा होणार असल्याचं पटोले यांनी सांगितले.
Share