राज्यात पुरोगामी विचाराला छेद देण्याचा प्रयत्न : नाना पटोले

मुंबई : महाराष्ट्र हे छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचाराने वाटचाल करणारे राज्य आहे. हा पुरोगामी विचारच राज्याला प्रगतीपथवार घेऊन गेला व तोच विचार राज्याच्या हिताचा आहे. परंतू मागील काही वर्षापासून महाराष्ट्रात जात्यांध्य व धार्मिक विचारला पुढे करुन राज्यात अशांतता निर्माण करण्याचे काम केले जात आहे. असे आवाहन काॅग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.

प्रदेश काॅग्रसचे मुख्यालय टिळक भवन येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा करण्यात आला. यावेळी पटोले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमाला विलास औताडे, संध्या सव्वालाखे,  हुसेन दलवाई, प्रमोद मोरे, मुनाफ हकिम, जो. जो. थॉमस, श्रीरंग बरगे, राजाराम देशमुख, गजानन देसाई आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना नाना पटोले पुढे म्हणाले की, राज्यात पुरोगामी विचार रुजलेला आहे, त्याला छेद देण्याचे काम काही लोक करत आहे. हा विचार राज्याच्या प्रगतीसाठी घातक आहे. केंद्रातील भाजपा सरकारने कामगार हिताच्या कायद्यामंध्य़े मोठे बदल करुन त्यांना देशोधडीला लावण्याचे काम केले आहे. मुठभर भांडवलदारांच्या दावणीला बांधून कामगारांचे हक्क व अधिकार हिरावण्याचे काम केले आहे पण कामगारांचे हक्क व अधिकार अबाधित ठेवण्यासाठी आपण काम करू.

Share