थंडीत गरम पाण्याने अंघोळ केल्यास होऊ शकतं मोठं नुकसान? जाणून घ्या काय आहे सत्य

थंडी वाढण्यास सुरुवात झाली की गरम पाण्याने तोंड धुण, गरम पाण्यानं अंघोळ करण्यास आपण सुरुवात करतो. बऱ्याचदा गरम पाण्यानं अंघोळ केल्यावर आपला थकवा दूर होतो असं वाटतं. मात्र गरम पाण्याने अंघोळ केल्यानं त्याचा शरीरावर काय परिणाम होत असतो याचा आपण विचार केला आहे का? आपल्याला गरम पाण्याने अंघोळ केल्यावर जरी थकवा दूर होत असला तरीही त्यापासून होणारं नुकसानही मोठं आहे. जाणून घेऊन हिवाळ्यात गरम पाण्यानं अंघोळ केल्यावर काय नुकसान होऊ शकतं ते.

१. गरम पाण्याने अंघोळ केल्यानं त्वचा कोरडी होते. त्वचेवरील मुलायमपणा कमी होतो. ज्यांची त्वचा संवेदनशील आहे अशा व्यक्तींनी कोमट अथवा थंड पाण्यानं अंघोळ करावी. कडक गरम पाणी वापरू नये.

२. जास्त गर्म पाण्याने अंघोळ केली तर त्वचेवरील स्फोअर ओपन होतात. त्वचा नाजूक होते. त्यामुळे इन्फेक्शन आणि अॅलर्जी होण्याचा धोका वाढतो.

३. एका रिसर्चमधून समोर आलेल्या माहितीनुसार गरम पाण्याने अंघोळ केली तर पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर त्याचा परिणाम होतो.

४. गरम पाण्याने अंघोळ केल्यानं सुस्ती येते. सतत झोप जाणवते. लहान मुलांना गरम पाण्यानं अंघोळ घातली की ती चांगली झोपतात ते उगाच नाही. गरम पाण्याने अंघोळ केल्यावर झोप शांत लागते असं सांगितलं जातं. तर थंड पाण्याने अंघोळ केली तर आळस आणि झोप दोन्ही निघून जातात आणि ऊर्जा येते. संपूर्ण दिवस उत्साहात जातो.

५. गरम पाण्यामुळे शरीरातील इम्युनिटी, मॉइश्चरायझर, कमी होत जातं. शरीरातील नॅचरल ऑइल लवकर संपण्याचा धोका असतो. त्यामुळे सुरकुत्या येऊ शकतात आणि चेहऱ्याची चमक दूर होऊ शकते.

६. जास्त गरम पाण्यामुळे डोळ्यांना इजा होऊ शकते. डोळ्यांना खाज येणं, आणि इन्फेक्शन होण्याचा धोका जास्त असतो.

Share