राज्यातील ९२ नगरपरिषदा आणि ४ नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर

मुंबई : राज्यातील ९२ नगर परिषदा आणि चार नगरपंचायतीमधील सार्वत्रिक निवडणूका जाहीर करण्यात आल्या आहेत.  निवडणुकींसाठी १८ऑगस्टला मतदान होईल. तर लगेच दुसऱ्याच दिवशी म्हणजे १९ऑगस्टला मतमोजणी होईल, अशी माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे.

याबाबत राज्य निवडणूक आयोगाने निर्देश दिले आहे. २२ ते २८ जुलैपर्यंत राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या संकेतस्थळावर उमेदवारांना नामनिर्देशनपत्र भरता येईल. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, क्लाहूपर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती आणि बुलढाणा या १७ जिल्ह्यातील ९२  नगर परिषदा आणि चार नगरपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत.

असा असेल निवडणुकीचा कार्यक्रम

उमेदवारी अर्ज उपलब्ध : २२ ते २८ जुलै.
अर्ज स्वीकारण्याचा कालावधी २२ ते २८ जुलै
अर्जाची छाननी : २९ जुलै
अर्ज मागे घेण्याची मुदत : ४ ऑगस्ट दुपारी ३ पर्यंत
उमदेवारी अर्जावरील आक्षेप : ८ऑगस्ट
मतदानाचा दिनांक : १८ ऑगस्ट
मतमोजणी आणि निकाल : १९ ऑगस्ट

अ वर्गातील ६ नगरपरिषदा

भुसावळ
बारामती
बार्शी
जालना
बीड
उस्मानाबाद

ब वर्गातील २८ नगरपरिषदा

मनमाड
सिन्नर
येवला
दौंडाईचा- वरवाडे
शिरपूर- वरवाडे
शहादा
अंमळनेर
चाळीसगाव
कोपरगाव
संगमनेर
श्रीरामपूर
चाकण
दौंड
कराड
फलटण
इस्लामपूर
विटा
अक्कलकोट
पंढरपूर
अकलूज
जयसिंगपूर
कन्नड
पैठण
अंबेजोगाई
माजलगाव
परळी-वैजनाथ
अहमदपूर
अंजनगाव- सुर्जी

क वर्गातील नगरपरिषदा

कोल्हापूर
कुरुंदवाड
मुरगुड
वडगांव
औरंगाबाद
गंगापूर

Share