राष्ट्रपती निवडणूकीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू विजयी

नवी दिल्लीः संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुक १८ जुलै सोमवारी पार पडलेल्या निवडणुकीचा निकाल काल रात्री जाहीर झाला. एनडीएच्या द्रौपदी मुर्मू यांनी बाजी मारली आहे. त्यांनी विरोधकांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचा पराभव केला आहे. द्रौपदी मुर्मू यांना ६४  टक्के मतं तर यशवंत सिन्हा यांना ३६ टक्के मतं मिळाली आहेत. राष्ट्रपतीपदावर विराजमान होणाऱ्या त्या पहिल्या आदिवासी महिला असतील. १५ व्या राष्ट्रपती  द्रौपदी मुर्मू या २४ जुलै रोजी राष्ट्रपतीपदाची शपथ घेतील.

देशाचे सध्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाल २४ जुलै रोजी समाप्त होणार आहे. तर नंतर २४ जुलै रोजी द्रौपदी मुर्मू राष्ट्रपतीपदाची शपथ घेतील. संसद भवन तसेच प्रत्येक राज्याच्या राजधानीतील विधानभवनात या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाने मतपत्रिका, मतपेट्या आदी साहित्य सर्व राज्यांमध्ये पोहोचवले आहे. द्रौपदी मुर्मू तसेच यशवंत सिन्हा यांनी देशातील विविध राज्यांच्या राजधानीत जाऊन प्रचार केला. झारखंडच्या माजी राज्यपाल असलेल्या द्रौपदी मुर्मू यांच्या उमेदवारीला भाजपच्या नेतृत्वातील रालोआतील मित्रपक्षांशिवाय अन्य काही पक्षांनीही पाठिंबा दिला आहे. बिजू जनता दल, बसपा, वायएसआर काँग्रेस, जनता दल सेक्युलर, तेलुगू देसम, शिवसेना तसेच शिरोमणी अकाली दलाने पाठिंबा दिला आहे.

माजी केंद्रीय मंत्री असलेले यशवंत सिन्हा यांच्या उमेदवारीला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रमुक, सपा, डावे पक्ष यांनी पाठिंबा दिला आहे. अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षानेही यशवंत सिन्हा यांच्या उमेदवारीला पाठिंबा जाहीर केला आहे. लोकसभा, राज्यसभेचे खासदार तसेच, देशातील सर्व विधानसभांचे आमदार या निवडणुकीत मतदान करू शकतात. राज्यसभेतील तसेच, विधान परिषदेतील नामनियुक्त सदस्यांना मतदानाचा अधिकार नसतो. खासदारांना हिरव्या रंगाची तर आमदारांसाठी गुलाबी रंगाची मतपत्रिका ठेवण्यात आली आहे.

देशात आतापर्यंत आदिवासी समुदायातील कोणीही व्यक्ती राष्ट्रपती बनलेला नाही. महिला, दलित, मुस्लीम आणि दक्षिण भारतातील व्यक्ती राष्ट्रपतीपदी विराजमान झाले आहेत. पण आदिवासी समाज यापासून वंचित राहिला होता. त्यामुळे आदिवासी समाजातील व्यक्तीला राष्ट्रपती होण्याचा बहुमान मिळावी अशी मागणी केली जात होती. आता  देशाच्या १५ व्या राष्ट्रपती  द्रौपदी मुर्मू  आहेत.

कोण आहेत द्रौपदी मुर्मू?
द्रौपदी मुर्मू या ओडिशातील आदिवासी नेत्या आहेत. ओडिशातील BJP-BJD युती सरकारमध्ये २००२ ते २००४ या काळात त्या मंत्री होत्या. त्यांनी झारखंडच्या नवव्या राज्यपाल म्हणून देखील काम केलं आहे. द्रौपदी मुर्मू या ओदिशाच्या रायरंगपुर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या होत्या.

Share