राहुल गांधी देशाचा आवाज; सुडबुद्धीची कारवाई सहन करणार नाही – नाना पटोले

मुंबई : केंद्रातील भाजप  सरकार काॅँग्रेस नेतृत्वाला सरकारी यंत्रणांच्या माध्यमातून घाबरण्याचा प्रयत्न करत आहे परंतु अशा दबावाला अथवा दहशतीला आम्ही भीक घालत नाही. देशातील जनतेचे प्रश्न हाती घेत मोदी सरकारला सातत्याने कोंडीत पकडणारे राहूल गांधी हे देशाचा आवाज बनले आहेत. त्यांच्यवरील सूडबुद्धीच्या कारवाईमुळे काॅँग्रेसचा कार्यकर्ता पेटून उठला आहे. ही कारवाई आम्ही सहन करणार नाही. केंद्र सरकाविरोधात आमचा संघर्ष सुरुच राहिल असा इशारा काॅँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे.

केंद्र सरकारने राहुल गांधींविरोधात काँग्रेसकडून राजभवनवर धडक मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी पटोले प्रसार माध्यमांशी बोलते होते ते म्हणाले, ‘राजकीय द्वेषातून भाजपा सरकार करत असलेल्या कारवाई विरोधात काँग्रेस  रस्त्यावर उतलेली असताना पोलीस बळाचा वापर करून मंत्री, खासदार, आमदार, महिला कार्यकर्त्यांना मारहाण केली जात आहे.

देशात आज अराजकता निर्माण केली आहे. याविरोधातील असंतोष व्यक्त केला जात आहे. केंद्रातील बहिऱ्या व मुक्या सरकारला अंसतोषाचा हा आवाज पोहचवण्यासठी राजभवनवर धडक मोर्चा काढला असून केंद्र सरकारच्या विरोधातील आमचा हा संघर्ष सुरुच राहिल असा इशारा पटोले यांनी यावेळी दिला.

यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, सोनिया व राहुल गांधी यांना नोटीसा पाठवून नाहक त्रास दिला जात आहे. तीन दिवस राहुल गांधी यांची चौकशीच्या नावाखाली छळ केला जात आहे. काँग्रेसचा कार्यकर्ता केंद्र सरकारची ही दडपशाही सहन करणारा नाही त्याविरोधात उभा राहिला आहे.

या मोर्चाच्या माध्यमातून हा असंतोष मोदी सरकारपर्यंत पोहचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. ज्या कुटुंबाने देशासाठी सर्वस्व त्याग केला, बलिदान केले त्या कुटुंबाला अशा प्रकरणे त्रास देणे निंदनीय आहे. मोदी सरकारच्या या दडपशाहीला सोनियाजी व राहुलजी गांधी पुरून उरतील. आमचे हे नेते मोदी सरकारच्या समोर कदापी झुकणारे नाहीत. आमच्या भावना राज्यपालांनी केंद्र सरकारला कळवाव्यात हीच आमची अपेक्षा असल्याचं थोरात म्हणाले.

या मोर्चात विधिमंडळ पक्षनेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, मंत्री अस्लम शेख, यशोमती ठाकूर, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, आ. अमर राजूरकर, प्रदेश कार्याध्यक्ष शिवाजीराव मोघे, चंद्रकांत हंडोरे, नसीम खान, बसवराज पाटील, उपाध्यक्ष मोहन जोशी, प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

Share