Rajya Sabha Election : आघाडीचे सर्व उमेदवार विजयी होतील- नाना पटोले

मुंबई : राज्यसभेच्या निवडणूका बिनविरोध करण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे. पण विरोधी पक्षाने या पंरपरेला तिलांजली दिली आहे. राज्यसभेसाठी खुले मतदान होत असते, महाविकास आघाडीकडे बहूमत असून आघाडीचे चारही उमेदवार निवडून येतील, असा विश्वास काॅँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.

काँग्रेस उमेदवार इम्रान प्रतापगढी यांनी यावेळी मराठीतून शपथ घेतली. यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षनेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, मत्स्यसंवर्धन मंत्री अस्लम शेख आदी उपस्थित होते.

काँग्रेस पक्ष हा विचारधारेवर चालणारा पक्ष

नाना पटोले म्हणाले की, देशाची एकात्मता मानणारा, त्या विचाराला, भाषेला मानणारा उमेदवार दिल्याबद्दल सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. काँग्रेस पक्ष हा विचारधारेवर चालणारा पक्ष आहे, पक्षात लोकशाही असून प्रतापगढी यांच्या उमेदवारीचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतला आहे. एका तरुण आणि उत्साही कार्यकर्त्याला उमेदवारी मिळाल्याने काँग्रेसमध्ये नवचैतन्य संचारले आहे. राज्यसभा उमेदवारीवरून हायकमांड यांनी घेतलेल्या निर्णयाचे सर्वांनी स्वागतच केले आहे. त्यांच्या उमेदवारीवरून जी चर्चा सुरु आहे ती निरर्थक आहे.

Share