संजय राऊत यांचं मानसिक संतुलन बिघडलंय – मंत्री शंभूराज देसाई

नागपूर : संजय राऊत जे बोलताता त्यामध्ये काही तथ्य नसते. तीन-साडेतीन महिने आराम केल्यामुळे त्यांचं थोडसं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे. अशी टिका राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर केली आहे.

मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, रोज नवा मुद्दा काढला जातो, सुरुवात एका मुद्य्यावर करतात, भरकटत तिसरीकडे जातात. त्यामुळे मला असं वाटतंय तीन-साडेतीन महिने आराम केल्यामुळे त्यांचं थोडसं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे. त्यांच्यावर उपाचाराची गरज आहे, जेणेकडून अशाप्रकारे बेताल बडबड करण्याचं राऊत थांबवतील. प्रसारमाध्यमंच त्यांना महत्त्व देतात, आम्ही त्यांच्या बेताल वक्तव्यांना महत्त्व देत नाहीत.असही देसाईंनी म्हटलं आहे.

Share