औरंगाबाद ग्रामीणसाठी नव्या एसपींची नियुक्ती

औरंगाबाद ग्रामीणसाठी नव्या एसपीची नियुक्ती करण्यात आली आहे. औरंगाबद ग्रामीणचे पोलिस अधीक्षक निमित गोयल यांची औरंगाबादेतच राज्य राखीव पोलिस बल गट न १४ चे समादेशक म्हणून बदली झाली आहे. औरंगबादचे नवीन पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया हे गडचिरोलीचे अपर पोलिस अधीक्षक होते.

मार्च २०२१ मध्ये त्यांनी नक्षलवाद्याविरुद्ध मोठी मोहीम राबवली होती. त्यानंतर त्यांची बदली नागपूरच्या उपायुक्तपदी झाली होती. त्याच बरोबर जालन्याचे पोलिस अधीक्षक विनायक देशमुख यांचीही मुंबईच्या पश्चिम प्रादेशिक विभागाच्या अपर पोलिस आयुक्तपडी बदली झाली आहे. आता जालन्याच्या अपर पोलिस अधीक्षकपदी अतुल कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 

Share