भाजपची सवयच आहे आरोप करण्याची – आदित्य ठाकरे

मुंबई – देवेंद्र फडणवीस यांना फोन टॅपिंग प्रकरणी नोटीस बजावत त्यांना आज चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. परंतू आज पोलिस अधिकाऱ्यांची एक तूकडी फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थान सागर बंगल्यावर हजर झाली असून त्यांची चौकशी करत आहे. यावरून भाजप आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपाच्या फेऱ्या रंगल्या आहेत. यावर राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्या ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

आदित्य ठाकरे पत्रकारांशी संवाद साधतांना म्हणाले की, मी कुठल्याही न्याय प्रक्रियेवर किंवा पोलीस प्रक्रियेवर फार काही बोलत नाही. भाजपाची आरोप करण्याची सवय आहे. आम्ही त्यावर उत्तर देत नाही आम्ही काम करतो. आम्ही कुठल्याही यंत्रणेला प्रचार यंत्रणा म्हणून वापरत नाही जसं केंद्र सरकारकडून होतं आहे . जी काही न्याय प्रक्रिया असते ती आम्ही पुढे नेत असतो, मी त्यावर कुठलही बाकीचं वक्तव्य करणार नाही. भाजपासमोर नैराश्य असल्याने ते अशाप्रकारे वागत आहेत, असं म्हणत आदित्या ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

 

Share