यांनी आंदोलने केली तेव्हा महाराष्ट्राची संस्कृती आठवली नाही का?,केशव उपाध्ये यांचा सवाल

मुंबई : काल एसटी कर्मचाऱ्यांनी आक्रमक पावित्रा घेत थेट शरद पवार यांच्या घरावर हल्ला करत आंदोलन केले. हे प्रकरण दुर्दैवीच आहे. यामागे कोणाचा हात आहे? हे पोलीस शोधून काढतीलच. परंतू ज्येष्ठ नेत्यांच्या घरावर आंदोलन  करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. असे म्हणून अनेकांना महाराष्ट्राच्या संस्कृतीची आठवण झाली.

असे करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाहीच. पण याची सुरुवात कॉंग्रेस नेत्यांनीच केली असल्याच केशव उपाध्ये म्हणाले आहेत. पूर्वी भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांच्या घराबाहेर आंदोलन करणारे कोण होते? असा प्रश्न केशव उपाध्ये यांनी उपस्थित केला आहे.

केशव उपाध्ये यांनी उपस्थित केलेले मुद्दे

  • एखाद्या मंत्र्याच्या विरोधात कोणी फेसबुक पोस्ट केली म्हणून मंत्र्याच्या बंगल्यावर नेऊन त्याला मारहाण करणे
    पोलिसाला मारहाण केली म्हणून न्यायालयाने तुरुंगवासाची शिक्षा ठोठावलेल्या व्यक्तीला मंत्रिपदी कायम ठेवणे
  • दाऊदशी संबंधित गुन्हेगारांशी आर्थिक व्यवहाराच्या आरोपामुळे अटक होऊन तुरुंगात असलेला नेता मंत्रिपदी कायम ठेवणे
  • मंत्र्याने पोलिसांना बोलावून महिना शंभर कोटींच्या खंडणी वसुलीचा आदेश देणे
  • काळ्या पैशावर कारवाई म्हणून ज्याची संपत्ती जप्त झाली त्याचे वाजतगाजत स्वागत करून मिरवणूक काढणे
  • राज्यपालांना सरकारी विमानातून उतरवणे
  • उद्योगपतीच्या घराजवळ स्फोटके ठेऊन साक्षीदाराचा खून करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची मुख्यमंत्र्यांनी पाठराखण करणे
  • सरकारी वकिलाच्या पुढाकाराने खोटे पुरावे तयार करून विरोधी पक्षाच्या नेत्यांना गोवणे
  • बदल्यांमधील भ्रष्टाचार उघडकीस आल्यानंतर त्यावर कारवाई करण्याच्या ऐवजी भ्रष्टाचार उघड करणाऱ्या अधिकाऱ्यालाच गुन्हेगार ठरविणे
  • जनादेशाचा अपमान करून आणि विश्वासघात करून सरकार स्थापन करणे
  • आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा होते ही अनेक वर्षाची परंपरा आहे. मात्र देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांना पंढरपुरात महापूजेपासून रोखणं
    ही सुद्धा महाराष्ट्राची संस्कृती नाही.

असे मुद्दे उपस्थित करून उपाध्ये यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

Share