देशभरात महाराष्ट्र काँग्रेसने कोरोना पसरवीले; पंतप्रधानांची टिका

नवी दिल्लीः  लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कालच्या भाषणादरम्यान काँग्रेस वर जोरदार हल्ला बोल केला. कोरोना महामारीच्या सुरवातीच्या काळातच देशभरात कोरोना पसरवण्याचं काम महाराष्ट्रातील काँग्रेस सरकारने केल्याचा गंभीर आरोप नरेंद्र मोदी यांनी केला आहे. कोरोना महामारीच्या काळात महाराष्ट्र काँग्रेसने मजुरांना स्थंलातर करायला लावले. परप्रांतियांना तिकिटं काढून देऊन स्थलांतर करण्यास भाग पाडले, अशी टिका नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र काँग्रेसवर केली आहे. तसेच दिल्लीतील ‘आम आदमी पक्षा’च्या सरकारने मजुरांना स्थलांतरित होण्यासाठी प्रवृत्त केले. या पक्षांनी महाभयानक संकटातही गलिच्छ राजकारण केले. अशी टिका नरेंद्र मोदी यांनी केली आहे.

कोरोना महामारीच्या सुरवातीच्या काळात देशभरात कोरोना पसरवण्याचं काम महाराष्ट्रातील काँग्रेस सरकारने केल्याचा आरोप संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. कोरोना काळात जागतिक आरोग्य संघटनेनं सर्वांनी जिथं आहात तिथंच थांबा, असं म्हटलं होतं. पण काँग्रेसनं यूपी-बिहारींना मुंबईतून बाहेर जाण्यासाठी उकसवलं. कोरोना लॉकडाऊनमध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने तर हद्दच केली, त्यांनी मुंबईतल्या परप्रांतीय मजुरांना रेल्वेची मोफत तिकीटे काढून दिली आणि महाराष्ट्रावरील बोजा कमी करण्याचं आवाहन केलं. राज्यातील काँग्रेस कार्यकर्ते स्टेशन बाहेर उभे राहून स्थलांतरीत मजुरांना राज्याबाहेर पाठवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं सांगून त्यांनी काँग्रेसनेच देशभरात कोरोना पसरवल्याचा आरोप केला. यूपी बिहारमध्ये जाऊन कोरोना पसरवा असं ते स्थलांतरीत मजुरांना सांगत असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात सांगितलं.

पंतप्रधान राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर झालेल्या चर्चेला उत्तर देताना बोलत होते. त्यावेळी गोंधळ घालणाऱ्या विरोधी पक्षाच्या खासदारांवर त्यांनी चांगलीच टीका केली. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, पराभवानंतरही काँग्रेसचा अहंकार जात नाही. उत्तर प्रदेश, बिहारमध्ये काँग्रेसला मते नाहीत. गोव्यात पुन्हा सत्ता मिळाली नाही. मतदार काँग्रेसला नाकारत आहेत. विरोधक २०१४ च्या मानसिकतेतून बाहेर आलेले नाहीत. उपदेश देताना काँग्रेस सत्तेतील ५० वर्ष विसरत आहे.

Share