७ मार्चनंतर मविआ सरकार पडणार ,चंद्रकांत पाटलांचा दावा

कोल्हापूर- भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ७ मार्चनंतर रोजी महाविकास आघाडी सरकार पडणार असल्याचा दावा आज पुन्हा एकदा कोल्हापूरातील पत्रकार परिषदे दरम्यान केला आहे. दिशा सलियन प्रकरणातील सर्व पुरावे बाहेर येतील तसेच यानंतर यात कोणाचा सहभाग आहे, कोणाकोणाला तुरुंगात जावं लागेल हेही स्पष्ट होईल आणि ७ मार्चनंतर हे सरकार पडणार असल्याचं पाटील यांनी म्हंटल आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, काही राजकारण नाही, दूध का दूध और पाणी का पाणी हो जायेगा. घाबरू नका, ७ मार्चला सर्व पुरावे समोर येतील. त्यात कुणाचा सहभाग आहे, कोणाकोणाला तुरुंगात जावं लागेल हे स्पष्ट होईल. उसणं अवसान आणणं आणि शिवराळ भाषेचा वापर यामुळेच सुरू आहे. दिवा विझण्याआधी फडफडतो. आपल्याला वाटतं दिवा खूप प्रज्वलित झाला. ती विझण्यापूर्वीची फडफड आहे, असं पाटील यांनी पत्रकार परिषदे दरम्यान म्हंटल आहे.

 

Share