कुठलेही भय मनात बाळगू नये कारण…. राज्यात मंकीपाॅक्सचे…

मुंबई : मंकीपाॅक्सचे एकही प्रकरण महाराष्ट्रात किंवा देशात नाही. त्यामुळे मंकीपाॅक्सचे कुठलेही भय मनात ठेवायचे कारण नाही. खबरदारी म्हणून आपण विमानतळांवर बाहेरून येणाऱ्या प्रवाशांची मेडिकल स्क्रिनिंग करत आहोत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

राज्यात ३६ जिल्ह्यांपैकी मुंबई आणि पुण्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. एकूण साडेतीन हजाराच्या आसपास सक्रिय रुग्ण सध्या राज्यात आहेत. त्यातील अडीच हजार रुग्ण हे एकट्या मुंबईमध्ये आहेत. रुग्णालयात रुग्ण दाखल होण्याच्या संख्येमध्ये मात्र वाढ दिसत नाही. तसेच रुग्णालयांमध्ये रुग्णांची भर्ती मोठ्या प्रमाणत होत नसल्याने सध्यातरी जम्बो कोविड सेंटरची आवश्यकता नाही.

पावसाळ्यात साथीचे रोग वाढतात. कारण पावसाळ्यामध्ये आपल्याला बहुतांश ठिकाणी पाणी साचलेले दिसते. त्या साचलेल्या पाण्यात मच्छरांची पैदास होते. ज्या ठिकाणी स्वच्छ पाणी मिळण्याची शक्यता कमी आहे, तेथील नागरिकांनी पाणी उकळून प्यावे, अशा सूचना आरोग्य विभागातून नेहमीच दिल्या जातात,असेही राजेश टोपे यांनी नमूद केले.

Share