कितीही मळमळ झाली तरी, मोदीच येणार- फडणवीस

मुंबई : गोवा विधानसभा निवडणूकीत भाजपाने सर्वाधिक जागा जिंकल्यानंतर गोवा निवडणूकीचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांचे मुंबईत जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी भाजपने मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन दाखवले. यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना फडणवीस म्हणाले कितीही मळमळ झाली तरी, मोदीच येणार, असं म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की,  मोदी है तो मुमकिन है असं सगळ्यांनाच वाटतं आणि ते या निवडणुकांत अनूभवायला मिळालं. आपल्यासाठी मोदी आहेत. कोरोनाकाळात मोदींनी मोठ्या प्रमाणात मदत केली.मोदींनी बेरोजगारांना उपाशी ठेवणार नाहीत. असा जो सर्वसामान्य नागरिकांना विश्वास वाटतो, तो विश्वास यातून परावर्तीत झाला आहे. असेही फडणवीस म्हणाले.

या विजयाचा आनंद सगळ्यांनाच झाला असं नाही. काही लोकांना इतकी मळमळ झाली की, अपरिचित देवतूतापेक्षा परिचित दैत्य बरा असं आहे. इतकी मळमळ बरी नाही. कितीही मळमळ झाली तरी येणार तर मोदीच. काळजी करुन नकाय या देशातील गरीब, मध्यमवर्गीय सर्वसामान्य, महिलांचा आशिर्वाद मोदी आणि भाजपला आहे. असेही फडणवीस म्हणाले.

Share