महाराष्ट्राच्या विकासासाठी आता डबल इंजिन – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : देशात राज्यांचा क्रमांक एक राखण्यात आणि राज्याच्या औद्योगिक विकासात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामडंळाचे मोठे योगदान आहे. मात्र आता उद्योगांना आकर्षित करण्यासाठी अन्य राज्ये ही सरसावरली आहेत. या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी सतत जागरुक रहाणे आवश्यक असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या ६० व्या वर्धापनदिन समारंभात ते बोलत होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलताना म्हणाले की, महामंडळाचे कार्य उल्लेखनीय आहे. आता पर्यंतचे सर्वधिक भूसंपादन महामंडाळाने केले आहे. पायाभूत सुविधा उभ्या केल्या आहेत. तरूणांसाठी रोजगार निर्मिती या महामडंळाच्या माध्यमातून होत आहे. कोरोना काळात उद्योग बंद होऊ न देता काम सुरू राहिले, याचाही मुख्यमंत्र्यानी उल्लेख केला. राज्यात मोठ्या प्रमाणात विकासाची कामे होत आहेत. समुद्धी महामार्ग, ट्रान्सहार्बर लिंक यामुळे दळणवळण सोपे होणार आहे. पर्यायाने राज्यातील व्यवसात वाढ होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याला सहकार्य करण्याटे आश्वासन दिलेले आहे. तेव्हा सगळ्यांच्या सहकार्याने औद्योगिक क्षेत्रात पुढे जाता येणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

राज्याचा वैश्विक चेहरा औद्योगिक विकास महामंडळ – देवेंद्र फडणवीस

राज्याला एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे नेण्यात महामंडळाचे मोठे योगदान आहे. राज्यात असलेली पायाभूत सुविधा, तंत्रज्ञानाचा वापर आणि मोठ्या प्रमाणात येत असलेली गुंतवणूक  या माध्यमातून हे साध्य करता येणार आहे. कोणत्याही राज्याच्या दहा वर्ष पुढे जाण्याची क्षमता आपल्या राज्याची आहे. स्टार्टअप क्षेत्रात राज्यात सर्वाधिक उद्योग आहेत, युनिकॉर्न कंपन्या राज्यात आहेत. सेवा, उद्योग , यासह कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर यामुळे राज्य सर्व उद्योग क्षेत्रात आपला प्रथम क्रमांक राखणार आहे, असा विश्वास उपमुख्यमंत्री यांनी व्यक्त केला. येणारा काळ हा स्पर्धेचा आहे, इतर राज्यांनी आपली क्षमता वाढविण्यास सुरुवात केली आहे, तेव्हा गाफील राहून चालणार नाही असा इशाराही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

Share