साहेबांना संरक्षण देण्यासाठी राणेंनी जिवाजी बाजी लावली होती, सेना नेत्याचा घरचा आहेर

हिंगोली/शंकर काळे: शिवसेना नेते संजय राऊत ईडीचा घोटाळा येत्या आठवड्यात जाहीर करणार असल्याचे वारंवार सांगत आहेत. नारायण राणे, किरीट सोमय्या यांच्यावर सातत्याने आरोपही करत आहेत मात्र यावेळेस त्यांच्या पक्षातील माजी खासदाराने त्यांना ईडी, राणे आणि त्यांच्या रोजच्या पत्रकार परिषदांवर टोला लगावला आहे. “ईडीचां घोटाळा जरूर काढा परंतु राज्यसभेत व लोकसभेत ही जनतेचे प्रश्न मांडा आणि नारायण राणेंवर शंका उपस्थित करताना बाळासाहेबांच्या सरंक्षणासाठी राणेंनी जिवाजी पर्वा केली नव्हती हे विचारात घ्या ” असा सल्ला शिवसेनेचे माजी खा.शिवाजी माने यांनी दिला आहे.

माने काय म्हणतात आपल्या फेसबुक पोस्टमध्ये
ईडी चां घोटाळां जरूर काढां परंतु राज्यसभेत व लोकसभेतही जनतेचे प्रश्न मांडा …. ईडीच कायं वाकडं होणारं हे ही आम्हालां माहीत आहे. आजपर्यंत अधिकार्याच काय झाल ते आत्ताच होणार आहे हे सर्वांनाच माहीत आहे.ही नविन समाजकारणाची पध्दती पहावयास मिळते आहे ज्याला आपण सुडाचे राजकारण म्हणु शकतो. बरं आम्ही कुणाशी भांडत आहोत (आपल्याशीच) न , काँग्रेस व राष्ट्रवादी रिंगणाच्या बाहेरून मजा घेत आहे.अजित दादा वगळता या विषयावर कुणी भाष्य केलय हे ऐकण्यात किंवा वाचण्यात नाही. गोर – गरीबांना घरे देण्याचं सोडून आम्ही आमचीचं पाडापाडी करत आहोत.अश्याने काय साध्य होणारं आहे .
संपुर्ण महाराष्ट्राला माहीत आहे कुणी किती कष्टाने कमाई केली आहे. संजय राऊत कोण होते? त्यांचा पगार किती होता? किंवा नारायण राणेंचे व्यवसाय कोणते?. बरं राणे आता एवढ्या उशिरा खुनी दिसू लागलेत त्यांना मुख्यमंत्री पदी बसविले होते त्यावेळी ते काय धुतल्या तांदळासारखे होते काय?. बरं साहेबांना संरक्षण देण्यासाठी त्यांनीच त्याच्या जिवाचीं पर्वा केली नव्हती हे विसरलात कां?. मुबंईत जी शिवसेना वाढली ज्यांत मोजून काही मंडळी होती त्यांत राणे होतेच. ऊगाच शिळ्या कढीला ऊत काय आणतं आहात . मग दत्ता सामांतापासूनच्या हत्येचा शोध घेत बसां.कोण कोण गुन्हेगार आणि गुन्हा करण्यास मदतं केली ते सर्व बाहेर येईलं शेवटी तुम्ही आम्ही सर्वचं जण फाटक्या शिवसैनिकांच्या जीवावर मोठे झाले आहोत. हे विसरून चाललोतं हे मात्र नक्की ,फाटक्यांचे राज्य कधी येणार त्यांच स्वप्न कधी पुर्ण होणारं ? एक गोष्ट विसरू नकां मुबंईला वाचविणारी मंडळीचं आपआपसात भिडते आहे व ती कशी संपेल याचीचं वाट काँग्रेस पहात आहे.

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. शिवाजी माने सध्या शिवसेना पक्षात आहेत मात्र त्यांच्या फेसबुक पोस्टवरून ते नेहमी काँग्रेसवर टीका करताना दिसतात.आपल्याच पक्षातील लोकांवरही त्यांनी शाब्दिक बाण सोडायला कधी संधी सोडली नाहीय. शिवाजी माने म्हणजे नेहमीच या पक्षातून त्या पक्षात उडी घेत असतात . त्यांच्या या भूमिकांमुळे “माने साहेब आता पुन्हा कुठल्या पक्षात जातील का?” अशा चर्चाना उधाण आलय.

Share