मंत्र्यांच्या बंगल्यांना गडकिल्यांची नाव

मंबईः राज्य सरकारने काही दिवसा पूर्वी राज्यातील सर्व दुकाने व आस्थापनांचे नामफलक मराठी भाषेमध्ये असावेत, असा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला. तरआता मंत्र्यांच्या बंगल्यांचेही नाव बदलली आहेत. मंत्र्यांच्या बंगल्यांना गडकिल्ल्यांची नावे देण्यात आली आहे.

मंत्र्यांचे बंगले आता गडकिल्ल्यांच्या नावानी ओळखले जाणार आहेत. यासाठी राज्यभरातील शिवप्रेमींनी सतत पाठपुरवठा केला होता. त्यांनी या संदर्भात उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे प्रस्ताव दिला होता. उदय सामंत यांनी या प्रस्तावावर सकारात्मक पाठपुरवठा केला. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंजुरीनंतर अखेर मंत्र्यांच्या शासकीय निवास्थानांचं नामांतर करण्यात आलेय.

मंत्री आदित्य ठाकरे यांच्या बंगला रायगड नावाने ओळखला जाणार आहे. तर मंत्री उदय सामंत यांचा बंगला रत्नसिंधू नावाने ओळखला जाणार आहे. मंत्री वर्षा गायकवाड यांच्या बंगल्याचा नाव पावनगड ओळखला जाणार आहे. इतर मंत्र्याच्या बंगल्यांनाही नावे देण्यात आले आहेत .

मंत्र्यांच्या बंगल्यांना गडकिल्ल्यांची नाव

अ-३- शिवगड- जितेंद्र आव्हाड
अ-४- राजगड- दादा भुसे
अ-५- प्रतापगड- के.सी.पाडवी
अ-६- रायगड- आदित्य ठाकरे
बी-१- सिंहगड- विजय वडेट्टीवार
बी-२- रत्नसिंधु- उदय सामंत
बी-३-जंजिरा- अमित देशमुख
बी-४-पावनगड- वर्षा गायकवाड
बी-५- विजयदुर्ग- हसन मुश्रीफ
क-५- अजिंक्यतारा- अनिल परब
क-६- प्रचितगड- बाळासाहेब पाटील

राज्यातील सर्व दुकानांवरती मराठीत पाट्या असाव्यात असा नियम राज्य सरकारने केला होता. पण त्याची अंमलबजावणी व्हायची नाही, तसेच दुकानदार यातून अनेक पळवाटा शोधायचे. या निर्णयाचे कुणी स्वागत करत आहे, कुणी याचं श्रेय घेत आहे तर कुणी या निर्णयावर नाराजी व्यक्त करत आहेत.

Share