केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा आणखी एक गौप्यस्फोट !

जळगाव-  भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी पुन्हा एकदा आघाडी सरकारला आक्रमक इशारा दिला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सादर केलेल्या पेन ड्राइव्हमध्ये सत्यता आहे. पेन ड्राइवमध्ये सत्यता नव्हती तर अ‍ॅड. प्रवीण चव्हाण यांचा राजीनामा का घेतला? आगामी काळात आम्ही आणखी चार पेनड्राइव्ह बाहेर काढणार आहोत , असा दावा करत दानवे यांनी  केला आहे.

एमआयएमने राष्ट्रवादीला युतीची ऑफर दिल्याच्या मुद्द्यावरूनही रावसाहेब दानवे यांनी आघाडी सरकारवर टीका केली आहे. एमआयएम महाविकास आघाडीसोबत आली काय आणि गेली काय, याच्याशी आम्हाला देणेघेणे नाही. आमचा मुद्दा शिवसेनेपर्यंत आहे. ज्या दिवशी शिवसेनेने भाजपशी दगा केला त्याचं दिवशी त्यांनी भगवं सोडून हिरवं पांघरल होत, अशा शब्दांत दानवे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

 

Share