महाराणा प्रताप यांना एमआयएमचा विरोध कशासाठी? राऊतांचा जलील यांना इशारा

औरंगाबाद- शहरातील कॅनाॅट परिसरात महाराणा प्रताप यांचा पुतळा उभारण्यावरून नवीन वाद सुरु झाला आहे. तब्बल एक कोटी रुपये खर्च करुन हा पुतळा उभारण्याचा प्रस्ताव आहे. एकीकडे शिवसेना आणि भाजपाने या पुतळ्यासाठी आग्रही मागणी केली असताना दुसरीकडे एमआयएमने मात्र विरोध दर्शवला आहे. खासदार इम्तियाज जलील यांनी या पुतळ्याला विरोध केला असून आता सेना एमआयएममध्ये चांगलीच जुंपली आहे.

या वादात सेनेचे स्थीनिक नेत्यांनी जलील यांना चागलेच प्रत्युत्तर दिले आहे. तर दुसरीकडे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना प्रतिक्रिया व्यक्त केली असून जलील यांना इशारा देखील दिला आहे.

संजय राऊत म्हणाले की, महाराणा प्रताप यांना एमआयएमचा विरोध कशासाठी? महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज हे या देशाच्या शौर्याच, राष्ट्रभक्तीच, राष्ट्रवादाचं प्रतिक आहेत. मोगलांविरुद्ध आक्रमकर्त्यां विरोधात त्यांची तलवार चालली, त्यांनी हिंदूंचं रक्षण केलं, हिंदू महिलांना संरक्षण दिलं, हिंदू मंदिरांचं रक्षण केलं. म्हणून जर कोणी महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज यांना विरोध करत असेल तर त्यांची तलवार आजही आमच्या हातात आहे हे त्यांनी लक्षात घ्यावं, असा इशारा संजय राऊत यांनी यावेळी दिला.

Share