महाराष्ट्रात समान नागरी कायदा लागू होणार? – देवेंद्र फडणवीस

मुंबई : राज्यात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी योग्य वेळी विचार करु, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं.त्यामुळे समान नागरी कायद्याबाबतच्या चर्चांना राज्यात उधाण आलं आहे.

उपमुख्यमंत्री फडणीस म्हणाले की, संविधानाने प्रत्येक राज्यात समान नागरी कायद्याचे अधिकार दिले आहेत. त्यामुळे हळूहळू सगळेच कायदा लागू करतील असं मला वाटतं, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. समान नागरी कायदा गोव्यात आहे, आता उत्तराखंड लागू करत आहे. हिमाचल प्रदेश, गुजरात हे राज्यही समान नागरी कायदा लागू करणार आहेत. हळूहळू सर्व राज्यांमध्ये समान नागरी कायदा लागू करतील. शिवाय त्यांना करावाच लागेल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

दरम्यान, महाराष्ट्रही योग्यवेळी हा कायदा लागू करण्याबाबत विचार करेल. संविधानाने याबाबत आपल्यावर जबाबतदारी टाकलीय की आपण राज्यात समान नागरी कायदा आणावा, असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं.

Share