महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री होऊ देणार नाही,राऊतांचा दावा

मुंबईः  शिवसेनेचे खा. संजय राऊत हे नेहमीच चर्चेत असतात. आज राऊत यांनी माध्यमांशी बोलताना भाजपावर मोठा दावा केला आहे. भाजपचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात पुढचे २५-३० होणार नाही असा मोठा दावा राऊत यांनी केला आहे. पुष्पातील डायलॉग झुकेंगे नही’ हा शिवसेनेच्या बाण्यावरून घेतला असावा. ‘झुकेंगे नही’ हा आमचा गेल्या ५० वर्षापासूनचा नारा आहे. संजय राऊतांचा तर तो नाराच आहे. कशाला झुकायचं? का झुकायचं? आमचे काही उमेदवार बाद झाले असतील पण आम्ही लढू, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

संजय राऊत म्हाणाले की, जे वैफल्य ग्रस्त असतात. निराश मनाने राजकारण करतात त्यांच्या नशिबी शेवटपर्यंत निराशाच असते. भाजपने स्वत:च अंधाऱ्या विहिरीत उडी मारली आहे. त्यांचा पक्ष जागतिक स्तरावरचा पक्ष आहे. उद्या ब्रिटनचा पंतप्रधान त्यांचा माणूस होईल, व्हाईट हाऊसमध्ये त्यांचा पंतप्रधान असेल असं ते सांगू शकतात. पण काही झालं तरी महाराष्ट्रात त्यांचा मुख्यमंत्री होणार नाही. महाराष्ट्रात पुढचे २५-३० वर्ष तरी त्यांची सत्ता येणार नाही. तोपर्यंत भाजप राहिल की नाही माहीत नाही, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केले. २०२४ मध्ये ज्या निवडणूक होणार आहेत, त्यातही दिल्लीतील चित्र बदलून जाईल. त्यांनी महाराष्ट्र विसरून जावे आता. ठिक आहे १०० लोकं जिंकतील, ७५ लोकं जिंकतील अजून काही करतील पण महाविकास आघाडी हेच या महाराष्ट्राचे भविष्य आहे, असा दावाही संजय राऊत यांनी केला.

Share