राज्यातील शाळा ‘या’ तारखेला सुरु होणार शिक्षणमंत्र्यांकडून तारीख जाहीर

मुंबई : राज्यात कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले असून दैनंदिन रुग्णसंख्या हजारांच्या आसपास पोहोचली आहे. कोरोना रुग्णवाढीमुळे चिंता वाढली असली तरी काळजी घेऊन आणि आरोग्य विभागाच्या सल्ल्यानेच शाळा सुरु केल्या जातील अशी माहिती राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

वर्षा गायकवाड म्हणाल्या की, राज्यातील शाळा १५ जून पासून सुरु होणार आहेत. १३ जून रोजी फक्त पहिलीच्या शाळांसाठी पहिलं पाऊल हे कार्यक्रम होणार आहे. अन्य शाळा १५ जूनला सुरू होणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांचे कोणत्याही नुकसान होऊ देणार नाही. खबरदारी घेऊन शाळा सुरू करणार आहोत, असं वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं

दरम्यान राज्यात सध्या मास्क कुठेही बंधनकारक नाही. त्यामुळए येणाऱ्या काळात परिस्थिती बघून शाळा संदर्भात निर्णय घेतला जाईल. त्याबरोबरच आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोरोनाची नेमकी परिस्थिती कळेल. त्यानंतर शाळा सुरू करण्यापूर्वी चाइल्ड टास्क फोर्स असेल किंवा आरोग्य विभाग त्यांच्याशी आम्ही चर्चा करू आणि निर्णय घेऊ, असं त्या म्हणाल्या. बारावीच्या निकालासंदर्भात बोलताना त्यांनी एका वाक्यात सांगितलं की, बारावीचा निकाल लवकरच लागेल.

Share