होळी धुलीवंदनासाठी, जाणून घ्या राज्य सरकारचे नवे नियम

मुंबई-  कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे राज्यात कोरोना प्रतिबंधक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मात्र रुग्णसंख्या कमी झालेली असली तरी योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. यामुळे पुन्हा एकदा लोकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. ही गर्दी कोरोना संसर्गवाढीला कारणीभूत ठरू नये म्हणून राज्य सरकारने होळी,धुलीवंदनासाठी नियमावली जारी केली आहे. या नियमावलीनुसार रात्री १० वाजेच्या आत होळी पेटवणे बंधनकारक करण्यात आलं आहे. तसेच होळी दरम्यान डीजे लावण्यावरदेखील बंदी घालण्यात आली आहे.

गृहखात्याने जारी केलेले नियम

– रात्री १० वाजताच्या आत होळी पेटवणे बंधनकारक आहे

– होळीदरम्यान डीजे लावण्यावर कायदेशीर बंदी आहे.

– दहावी तसेच बारावी वर्गाच्या परीक्षा सुरु असल्यामुळे लाऊडस्पीकरचा आवाज मोठा केल्यास कारवाई होईल.

– होळी साजरी करताना मद्यपान तसेच गैरवर्तन केल्यास कारवाई होईल.

– होळी खेळताना महिला तसेच मुलींची खबरदारी घेण्याचे आवाहन.

– कोणत्याही जातीधर्माच्या भावना दुखावतील अशा घोषणा देऊ नये.

– धुलीवंदनाच्या दिवशी जबरदस्तीने रंग लावू नये, पाण्याचे फुगे फेकू नयेत.

दरम्यान, गृह विभागाने जारी केलेली नियमावली तसेच कोरोना प्रतिबंधक नियमांचेही पालन करावे, असे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे.

Share