राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या धमक्या देऊ नका : संजय राऊत

मुंबई : मुंबईत येऊन आव्हान द्याल तर, शिवसैनिक गप्प बसणार नाहीत. सीबीआय मागे लावा, ईडी लावा, आम्हाला त्रास द्या आम्हाला काही फरक पडत नाही. तुम्ही तुमच्या लायकीप्रमाणे राहा. राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या धमक्या आम्हाला देऊ नका, आम्ही तुम्हाला घाबरत नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

हनुमान चालिसा वाचण्यासाठी ‘मातोश्री’ वर जाण्याच्या आ. रवी राणा आणि खा. नवनीत राणा यांच्या निर्धारामुळे सध्या मुंबईतील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. शिवसैनिक राणा दाम्पत्याविरोधात आक्रमक झाले आहेत. राणा यांच्या खारमधील घराबाहेर शिवसैनिक सकाळपासून आक्रमक आंदोलन करत आहेत. शिवसैनिकांनी सध्या राणा दाम्पत्य राहत असलेल्या निवासस्थानाला वेढा घातला आहे. राणा दाम्पत्याला डिवचण्यासाठी या परिसरात शिवसैनिकांनी एक रुग्णवाहिका आणली आहे. या रुग्णवाहिकेवर ‘रिझर्व्हड फॉर बंटी-बंबली’, असा फलक लावण्यात आला आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी एक ट्विट केले आहे. Enough is Enough! आता संयम आणि सौजन्याची ऐशी तैशी… जय महाराष्ट्र!!, असा मजकूर या ट्विटमध्ये लिहिला आहे.

https://twitter.com/rautsanjay61/status/1517738975330328576?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1517738975330328576%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fmaharashtratimes.com%2Fmaharashtra%2Fmumbai-news%2Fmaharashtra-political-breaking-news-mumbai-news-national-politics-live-updates-23-april-2022-today%2Fliveblog%2F91019923.cms

दरम्यान, नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले, दोन दिवसांत राज्यात ज्या घटना आपण पाहत आहोत, हा शिवसैनिकांच्या भावनांचा उद्रेक नाही, अजून काहीच सुरुवात झालेली नाही. आ. रवी राणा आणि खा. नवनीत राणा ‘मातोश्री’ला बदनाम करताहेत. तुम्ही तुमच्या लायकीप्रमाणे वागा. ‘झुंडशाही’ला झुंडशाहीप्रमाणे उत्तर देऊ. महाराष्ट्रात शिवसेनेला आव्हान देण्यासाठी सात जन्म घ्यावे लागतील. तुम्ही जर आमच्यावर हात उगारायचा प्रयत्न कराल तर लाखो शिवसैनिक गप्प बसणार नाही. तुम्ही घरात घुसण्याचा प्रयत्न कराल तर तुम्हालाही घर आहे हे लक्षात ठेवा. शिवसैनिक मरायला आणि मारायलाही तयार आहेत. आम्हाला आमच्या घराच्या रक्षणासाठी पोलिसांची गरज नाही, शिवसैनिक सक्षम आहे आणि शिवसैनिक हा सदैव मरायला आणि मारायला तयार असतो. सरकार असल्यामुळे नक्की आमचे हात बांधले आहेत, असा इशारा खा. राऊत यांनी दिला.

केंद्रीय यंत्रणांच्या बळावर तुमची जी झुंडशाही सुरू आहे त्याला शिवसैनिकांनी झुंडशाहीनं उत्तर दिलं, तर तुम्हाला मिरच्या का झोंबतायत, तुम्ही हात उगारण्याचा प्रयत्न कराल तर तो शिवसैनिक आहे आणि हा महाराष्ट्र आहे, तो स्वस्थ बसणार नाही. सत्तेची पर्वा आम्हाला नाही. शिवसेना हीच एक पावर आहे. बायकाच्या अडून हे शिखंडीचे उद्योग भाजप करत आहे, ते बंद करा, असेही राऊत यांनी भाजपला बजावले.

Share